परवा म्हणजे ३० जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेप (२ जन्मठेप ) झाल्याची शताब्दी होती, खरं म्हणजे हे लक्षातच नव्हतं, नाहीतर विशेष लेख वा कविता प्रसिद्ध करता आली असती, त्याबद्दल क्षमस्व! खरं म्हणजे कुणाची क्षमा मागणार? आपण एवढा मोठा दिवस विसरलो, देशासाठी सर्वस्व सहज आनंदाने एखादे फुल अर्पण करावे तसे ज्यांनी केले, त्यांच्याबद्दल एवढी तरी कृतज्ञता हवी. हि कृतज्ञता श्री. अमोल देशमुख यांनी मीमराठी ( http://www.mimarathi.net/) स्वा. सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी वर अभिव्यक्त केली. त्यावर प्रतिसादहि सुंदर आले.कोण देशभक्त स्वा. सावरकरांचा विरोध करेल! याचाच उलटा अर्थ स्वा. सावरकरांचा विरोध व द्वेष करणारा हा देशभक्त तर सोडाच पण देशद्रोही आहे. अरे म्हणजे यांची निष्ठा कुठे दुसरीकडे तर नाही ना ? काय आपण सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे अजून काय बोलणार?
असो. या प्रतिसादांमध्ये श्री. गब्बर सिंगांचा (ते हेच नाव मिम वर लिहितात ) प्रतिसाद वाचून..त्यापासून प्रेरणा मिळून हि कविता सुचली .....
तो प्रतिसाद - आपल्या स्वातंत्र्यासाठी ... त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. We literally owe our liberty to them ...
असो. या प्रतिसादांमध्ये श्री. गब्बर सिंगांचा (ते हेच नाव मिम वर लिहितात ) प्रतिसाद वाचून..त्यापासून प्रेरणा मिळून हि कविता सुचली .....
तो प्रतिसाद - आपल्या स्वातंत्र्यासाठी ... त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. We literally owe our liberty to them ...
अशेष भारत शांत व्हावा
वैभवाने फुलून यावा
जाळे ते तू तोडूनी दे
विच्छेद कर संशयाचा साऱ्या
प्रकाश ज्ञानाचा पसरू दे
भिऊ नकोस नकोस थांबू
नकोस रडू खोट्या भयाने
जग हे आहे सत्यासाठी
त्यास जाणुनी अभय आता
जगी पुन्हा पसरू दे
विचार नको, नको ते संशय
मागे नेती यशास जे
शांत हृदय - दृढ निश्चयाने
कालचक्र आता फिरवायचे
कालचक्र आता फिरवायचे .......
श्री. रणजितजींचा support आणि प्रोत्साहन तर आहेच.....